Posts

Showing posts with the label nitesh rane

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात.. जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ? शेवटी चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे ना !! आणि खर्या आयुष्यात नारायण राणे काय ग्रेट माणूस आहे कि काय ? ह्या महात्म्याची सत्ता लालसा सगळ्यांना ठाऊक आहे.. अवधूत गुप्ते ना बेस्ट लक.. मित्र तुझा जन्म भारतात झाला आहे आणि मूर्ख राजकारणी लोकांच्या जीवनावर (?) तू चित्रपट काढत आहेस हीच तुझी चूक आहे.. तू तुझा फायदा नुकसान काय होते ते बघ आणि अशोक चव्हाण यांच्या आवाहनाला दाद देऊन तू तक्रार कर.. भलेही अशोक चव्हाण त्याचा राजकीय लाभ उठवतील पण राणे सारख्या विघ्नसंतोषी माणसाला धडा तर मिळेल.. त्यानंतर मात्र तुला आयुष्यभर राणे टोळीपासून धोका उद्भवू शकतो.. पण याला काहीही इलाज नाही कारण नितेश राणे आणि त्याचे पूज्य पिताश्री यांच्यासारख्यांनी पूर्ण भारत बरबटला आहे..

...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार आणि इतर

"...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार" याला म्हणतात "मान या ना मान मी तेरा मेहमान" किंवा "संडास मालकाचा आणि रुबाब साफ करणार्याचा".. काही संबंध आहे का नितीश राणे (नारोबा राणेंचे सुपुत्र हीच त्यांची ओळख) याच्याशी !! आत्ताच पाणी मोर्चा काढून थोबाड रंगवून घेतले माणिकराव ठाकरेंकडून तरी अक्कल नाही आली.. म्हणजे स्वाभिमान संघटना व्य्क्तीपुजक आहे.. त्याचा "स्वाभिमान" शी काहीही संबंध नाही ? शेतकऱ्यांसाठी आणि पाण्यासाठी आंदोलने केल्यापेक्षा काही तरी विधायक कामे केली तर कुणी ऐकेल तरी.. उगाच गोंधळ करून सवंग प्रसिद्धी मिळवायचा अट्टाहास का ? -------------------------------------------------------- सुरिंदर कोलीच्या मृत्यूदंडाला स्थगिती घ्या !! आपल्या "न्याय"व्यवस्थेचे उत्तम उदाहरण. होपलेस लेकाचे !! ---------------------------------------------------------------------- अमरसिंह यांनी सोडली 'सप'ची तिन्ही पदे आता हे सर्व राजकारण पण दे सोडून म्हणावे.. उगाच जोकरगिरी करून प्रसिद्धीच्या झोतात तरी नाही दिसणार. उथळ वक्तव्यांमुळे टीवी वा...