अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात.. जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ? शेवटी चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे ना !! आणि खर्या आयुष्यात नारायण राणे काय ग्रेट माणूस आहे कि काय ? ह्या महात्म्याची सत्ता लालसा सगळ्यांना ठाऊक आहे.. अवधूत गुप्ते ना बेस्ट लक.. मित्र तुझा जन्म भारतात झाला आहे आणि मूर्ख राजकारणी लोकांच्या जीवनावर (?) तू चित्रपट काढत आहेस हीच तुझी चूक आहे.. तू तुझा फायदा नुकसान काय होते ते बघ आणि अशोक चव्हाण यांच्या आवाहनाला दाद देऊन तू तक्रार कर.. भलेही अशोक चव्हाण त्याचा राजकीय लाभ उठवतील पण राणे सारख्या विघ्नसंतोषी माणसाला धडा तर मिळेल.. त्यानंतर मात्र तुला आयुष्यभर राणे टोळीपासून धोका उद्भवू शकतो.. पण याला काहीही इलाज नाही कारण नितेश राणे आणि त्याचे पूज्य पिताश्री यांच्यासारख्यांनी पूर्ण भारत बरबटला आहे..
कायदा म्हणतो महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४ लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे. शासनाचे स्पष्टीकरण टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा ...
लांछनास्पद बातमी आहे हि.. भारत सरकार जगाला नक्की काय सिद्ध करून दाखवू इच्छिते ?? कि आम्ही किती महान न्याय दाते आहोत ?? आणि तो हलकट अजून मागण्या वाढवतोय.. त्याला चांगले जेवण हवे.. वाचायला उर्दू वर्तमान पत्र हवे.. पुस्तके हवीत.. इथे ज्या लोकांच्या तोंड चा घास त्याने हिसकावला त्याची काहीही चाड नाही सरकारला.. आणि असल्या नराधमाचे चोचले पुरवत आहेत.. हेच का आपले लोकमान्य सरकार ?? म्हणजे सरकारला अतिरेकी आणि गुन्हेगारांवर खर्च करायला हवा आणि पोलिसांना नवीन हत्यारे द्यायला खर्चाला परवानगी आणि लाल फीत?? असे कसे.. कसाबसाठी आर्थर रोड जेलमध्ये बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ असे खास तुरुंग (स्पेशल सेल) तयार करण्यात आले आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक जोरात आपटला तरी या तुरुंगात ठेवलेल्या कसाबला काहीही होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जे जे हॉस्पिटलच्या आवारातही कसाबसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तब्येत बिघडल्यास कसाबला ताबडतोब जे जे मध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज सज्ज आहे. मागील काही महिन्यात कसाबला जे जे मध्ये नेण्याची वेळ आली नसली तरी वेळ पडल्यास त्याच्या प्रकृतीची ह...
Comments
Post a Comment