सरकारचा मराठी 'गिअर रिव्हर्स'मधे काय सरकार आहे कि गमजा ? महाराष्ट्रात मराठी जरुरी नाही ? हा अशोक चव्हाण घरात नक्कीच तेलुगु बोलत असतील. कारण मंत्रिमंडळ स्थापन करायच्या वेळेस लवकर काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा सत्य साई बाबांची पाद्यपूजा करत बसणे सर्वांनीच पाहिले.. " टॅक्सी परवान्यासाठी मराठी सक्तीचेः मुख्यमंत्री" असे कालचे विधान आज मागे ? माकडचाळे आहेत कि काय ? माकडे देखील लगेच कोलांट्या उड्या नाही घेत.. हा असला मुख्यमंत्री ज्याला राज्याभाषेची कदर नाही तो माणूस काय प्रगती करणार, डोम्बल ?? आणि बाकी मंत्री कुणीच विरोध नाही करत.. सगळे दिलेली "खाती" भोगत बसलेत.. लाज वाटत आहे की नंबर एक असलेले राज्य असल्या ढिसाळ नेतृत्वामुळे घसरत चालले आहे.. एकाहून एक सरीसृप मुख्यमंत्री लाभलेत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण.. आता सर्वांनाच तमिळ नाहीतर तेलुगु, कन्नड शिकावी लागणार असे दिसते.. महाराष्ट्रात काही राहिले नाही .. वीज नाही पाणी नाही संधी नाही नुसती रेड टेप.. ------------------------------------------------------------------------------------------- मंडई बांधली; पण रस्ताच नाह...
कायदा म्हणतो महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४ लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे. शासनाचे स्पष्टीकरण टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा ...
काही हलकट नराधमांनी सतीश शेट्टी या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे.. ही केवळ हत्या नसून भारताच्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब आहे.. जो माणूस अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो त्याचा असा शेवट होणे हे केवळ आपल्या "सुव्यवास्थे" अधपतन आहे.. आणि जर शासनाने यावर काहीही हालचाल केली नाहीतर यामध्ये शासन आणि शिपुरद्यान्चा (शिपुरडे म्हणजे पोलीस) देखील हात आहे हेच सिद्ध होते.. अजून किती दिवस हे चालणार ? बिल्डर्स, नगरसेवक, शासकीय कर्मचारी, कदाचित पोलीस देखील उद्या दिवसाढवळ्या अन्याय करत फिरतील.. प्रदीप शर्माने ते दाखवून दिले आहेच.. जमिनीला आले भाव कि गैरव्यवहार चालू.. याची शेती त्याच्या नावावर आणि जमिनी हडप करणे आलेच ओघाने.. आणि त्याला झकास पैकी राजकीय आशीर्वाद हे तर उघडे गुपित आहे. ह्यावर अंकुश कुणाचाही नाही.. मोकाट सुटलेले हे हव्यासी लोक त्यांच्या आड येणाऱ्या लोकांचा असा मारेकरी घालून जीव घेतात.. आणि अर्थात आपल्या न्यायालयाची न्यायदेवता आंधळी आहे... त्यामुळे उघड्या डोळ्याने काही नाही दिसत आणि न्यायचे दूत (न्यायाधीश आणि वकील) म्हणजे जे दाखवतात ते मान्य अस...
Comments
Post a Comment