म्हणून या मुर्खांचा राग येतो.. इथे येउन घाण करतात.. स्वतःच्या राज्यांची अशीच वाट लावली आता बाकी ठिकाणची वाट लावत आहेत. |
पीछेहाट !!!
सरकारचा मराठी 'गिअर रिव्हर्स'मधे काय सरकार आहे कि गमजा ? महाराष्ट्रात मराठी जरुरी नाही ? हा अशोक चव्हाण घरात नक्कीच तेलुगु बोलत असतील. कारण मंत्रिमंडळ स्थापन करायच्या वेळेस लवकर काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा सत्य साई बाबांची पाद्यपूजा करत बसणे सर्वांनीच पाहिले.. " टॅक्सी परवान्यासाठी मराठी सक्तीचेः मुख्यमंत्री" असे कालचे विधान आज मागे ? माकडचाळे आहेत कि काय ? माकडे देखील लगेच कोलांट्या उड्या नाही घेत.. हा असला मुख्यमंत्री ज्याला राज्याभाषेची कदर नाही तो माणूस काय प्रगती करणार, डोम्बल ?? आणि बाकी मंत्री कुणीच विरोध नाही करत.. सगळे दिलेली "खाती" भोगत बसलेत.. लाज वाटत आहे की नंबर एक असलेले राज्य असल्या ढिसाळ नेतृत्वामुळे घसरत चालले आहे.. एकाहून एक सरीसृप मुख्यमंत्री लाभलेत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण.. आता सर्वांनाच तमिळ नाहीतर तेलुगु, कन्नड शिकावी लागणार असे दिसते.. महाराष्ट्रात काही राहिले नाही .. वीज नाही पाणी नाही संधी नाही नुसती रेड टेप.. ------------------------------------------------------------------------------------------- मंडई बांधली; पण रस्ताच नाह...
Comments
Post a Comment