कायदेशीर चोरी

मंत्र्याबरोबरचा विमानप्रवास मोफत

याला म्हणतात कायदेशीर चोरी... किंवा कायदेशीर लुटालूट.. कायदा हेच हरामी करणार मग करतांना स्वतःचाच विचार करणार..
जर ह्या कुत्र्यांना कुठे विसित द्यायची आहे तर कुटुंब कशाला घेऊन तरफडायचे.. कुटुंब आणि नातेवाईक त्या विसित च्या ठिकाणी जाऊन काय करणार ? त्यांचे तिथे काय काम.. काय सहल आहे काय ? ते देखील करदात्यांच्या पैशांनी ? आधीच हे खासदार, आमदार, नगरसेवक कामे करत नाहीत.. बघावे तेव्हा स्वतःचे खिसे भरण्यात मग्न.. आणि हे भिक्कारचो** विमानाच्या प्रवासाचे पैसे पण भरू शकत नाही काय ?
अरे काही जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा !!
भारत रसातळाला जात आहे त्याची हि तर नांदी आहे..
इथे कुंपणच शेत खातेय त्याला शेतकरी काय करणार..
भारतात जन्म होणे म्हणजे काही पूर्वजन्मीचे भयाण पाप असावे..

--------------------------------------------------------------------------------------------------------

अजितदादा व पतंगराव कदम यांच्या संस्थांना कात्रजचा भूखंड देण्यास स्थगिती

बरे झाले .. कशाला पाहिजे भूखंड.. आणि तेदेखील मोक्याच्या जागी ?? भारती विद्यापीठाच्या नावाने किती जागा लाटली रे पतन्ग्या ??आणि सरकारी मालकीचा भूखंड असा खाजगी मालकीचा होऊच कसा शकतो.. हे तर भयंकर आहे.. सत्ता आली कि लाटा सगळ्या जमिनी आणि त्यावर करा स्वतःच्या so called प्रतिष्ठीत संस्था.. आणि ह्या संस्था काय करतात? भरपूर देणग्या (म्हणजेच भीक या संदर्भात) मागून मुलांना प्रवेश देतात.. मग विद्यार्थ्याला ५०% मार्क असले तरी काहीही हरकत नाही.. ५० लाख टाका ह्यांच्या मड्यावर आणि करा डॉक्टर आणि इंजिनर.. देणगी देणारे गब्बर असतातच.. आणि सरकार मध्ये काही "शब्द" टाकून देतात मिळवून कामे..
हा भूखंड रिकामा का होता ? "या भूखंडावर कात्रज संघाला दूध भुकटीपासून पशुवैद्यकीय दवाखाना, खाद्यनिर्मिती असे प्रकल्प उभारायचे होते; परंतु हे प्रकल्प कागदावरच होते."
म्हणजे हेच दलाल लोक ह्या योजना पूर्ण होऊ देत नाहीत.. आणि मग लाटा भूखंड..
"राज्यात मध्यंतरी झालेल्या मंत्रिबदलानंतर डॉ. कदम यांच्याकडे महसूलमंत्रिपद आले. या पदाच्या काळात डॉ. कदम यांनी कात्रज येथील या भूखंडापैकी अडीच एकर क्षेत्र स्वत:च्या भारती विद्यापीठाला देण्याचा आदेश दिला." ही जागा काय पतन्ग्या च्या बापाची होती कि काय ? जर दुध संघ गेले नसता न्यायालयात तर चोर्लीच असती कि ह्याने जागा..

हे असले शिक्षण सम्राट जे शिक्षणाचा बाजार करतात त्यांना जाहीर रीत्या कपडे काढून चपलेने मारले पाहिजे.. ह्या शिक्षणाच्या बाजारामुळे सामान्य लोकांच्या पोरांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जातोय.. सामान्य लोक कुठून आणणार इतके पैसे.. बालवाडीची देणगी १ लाख झालीय... मग मुन्सिपाल्टीच्या शाळेत तेच standard असणार का? मग खाजगी शिक्षण संस्था काढायला परवानगी दिल्यापेक्षा ज्या शाळेत सामान्य लोकांची मुले जातात त्यांची गुणवत्ता वाढवायला नको का ?
पण असे होणार नाही.. कारण भारत "महान" देश आहे.. शिक्षण मंत्री हेच चोर आणि खाजगी शाळांना मान्यता देणारे हेच चोर..
इतके पैसे खर्च करून मग कशाला शिकवायचे पोरांना भारतात.. ऑस्ट्रेलिया मध्ये शिकवा ना.. तिथे वर्णभेद आहे आणि इथे वर्णभेद(जात पात) , अर्थभेद, प्रांतभेद , धर्मभेद सगळेच आहे .. मार खातील पोरे तिथे पण नंतर सुखाने जगतील ना... आणि मुख्य म्हणजे ह्या भारतातल्या घाण दलदलीतून बाहेर तरी निघतील.. इथे कोण कधी आणि कसा मरेल याचा नेम नाही.. जर जगला वाचा तर दोन वेळचे पोट भरायच्या मागे सुख गमावेल.. त्यापेक्षा ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन कुठेही जा पण भारतात नको रे बाबा..
------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

  1. खुप छान झाला आहे लेख. पतंग्याच नाही तर सगळेच महसुलमंत्री जसं एकेकाळच उदयनराजे, रामराजे हे लोक महसुलमंत्री यासाठीच होतात. जमिनी लाटणे हा यांचा धंदा. अजित पवार हा या सगळ्यांचा दादा आहे. स्रर्वात मोठा गुंड.

    -अजय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

TAXI PERMIT कायदा काय म्हणतो ?

कसाबवर ३१ कोटीचा खर्च झालाय